दिल्लीत भोजन आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप, ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा

On: February 13, 2025 7:02 PM
Uday Samant Responds on Operation Tiger
---Advertisement---

Operation Tiger | महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) ची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाच्या नेत्यांमध्ये वाढती अस्वस्थता आणि पक्षांतराच्या चर्चांमध्ये कोकणातील मोठे नेते आणि माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ‘जय महाराष्ट्र’ करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

‘ऑपरेशन टायगर’ की नैसर्गिक पक्षांतरे?

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ‘ऑपरेशन टायगर’ या चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे. दिल्लीत ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या निवासस्थानी भोजनासाठी हजेरी लावल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले.

यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांचे काम ठाकरे गटाच्या नेत्यांना पटत आहे, त्यामुळेच मोठ्या संख्येने लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे हे ‘ऑपरेशन टायगर’ नाही, तर लोकशाहीतील नैसर्गिक पक्षांतरे आहेत.” (Operation Tiger)

राजन साळवी यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी?

राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला कोकणात अधिक बळ मिळणार आहे. उदय सामंत यांनी सांगितले की, “राजन साळवी यांनी कोणत्याही पदाची मागणी केली नाही. मात्र, एकनाथ शिंदे त्यांना योग्य मान-सन्मान देतील आणि संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देतील.”

त्यांनी पुढे सांगितले की, “आगामी काळात ठाकरे गटातील आणखी काही नेते शिंदे गटात प्रवेश करतील.” त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.

Title: Uday Samant Responds on Operation Tiger

 

Join WhatsApp Group

Join Now