Jaikumar Gore | मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
फडणवीस यांनी सांगितले की, जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांच्यावर राजकीय कटाअंतर्गत खोटे आरोप लावण्यात आले. त्यांना अडकवण्यासाठी मोठी योजना आखण्यात आली होती. पोलिसांनी योग्य तपास करून आरोपींना अटक केली आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचं राजकारण योग्य नाही.
या प्रकरणात काही धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल रेकॉर्ड्स मिळाले असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे. तुषार खरात यांच्याशी त्यांचा संवाद झाल्याची माहिती मिळाली आहे असेही ते म्हणाले.
सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचे नाव चर्चेत
ही घटना २०१७ मधील आहे. त्यावेळी जयकुमार गोरे भाजपमध्ये नव्हते. तरीही त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी हिंमतीने पोलिसांकडे तक्रार केली. फडणवीस यांनी सांगितले की, ही संपूर्ण घटना ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. जयकुमार गोरे यांनी ट्रॅप लावून सर्व पुरावे गोळा केले. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अजून कोणते पुरावे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “राजकारणात मतभेद असतील, पण एखाद्याचे आयुष्य उध्वस्त करणे योग्य नाही.” हा खुलासा समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.






