Astrology | हिंदू पंचांगानुसार मेष संक्रांती (Mesha Sankranti) हा अत्यंत महत्त्वाचा खगोलीय क्षण मानला जातो. यावर्षी 14 एप्रिल 2026 रोजी सूर्यदेव मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहेत. मात्र याच वेळी ‘वैधृति योग’ नावाचा अशुभ योग तयार होत असल्याने काही राशींवर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता ज्योतिषतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
वैधृति योगाचे ज्योतिषातील महत्त्व :
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य (Surya) आणि चंद्र (Chandra) यांच्या रेखांशांची एकत्रित बेरीज 346°40′ ते 360° दरम्यान पोहोचली की ‘वैधृति योग’ (Vaidhriti Yoga) निर्माण होतो. हा योग अत्यंत अशुभ मानला जातो आणि त्याची तुलना ‘अतिगंड योग’ (Atigand Yoga) सारख्या प्रतिकूल योगांशी केली जाते. या कालावधीत केलेल्या शुभ कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता असते तसेच महत्त्वाचे निर्णय घेताना नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जाते. (zodiac warning astrology)
मेष संक्रांतीच्या दिवशी तयार होणाऱ्या या योगामुळे काही राशींना अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेषतः आर्थिक व्यवहार, गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक असल्याचे ज्योतिष अभ्यासक सांगतात.
Astrology | या तीन राशींवर पडू शकतो प्रभाव :
मेष (Aries) राशीसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करत असल्याने वैधृति योगाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. या काळात स्वभावात चिडचिड वाढण्याची शक्यता असून अहंकारामुळे वाद निर्माण होऊ शकतात. आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी जोखीम घेणे टाळावे, अन्यथा गुंतवलेले पैसे अडकण्याची शक्यता असते. तसेच डोकेदुखी किंवा उष्णतेशी संबंधित त्रास जाणवू शकतो.
कर्क (Cancer) राशीच्या व्यक्तींवर मानसिक तणावाचा प्रभाव जाणवू शकतो. या राशीचा स्वामी चंद्र असल्याने वैधृति योगात त्याची स्थिती अस्थिर राहते. त्यामुळे मन अस्वस्थ राहणे, चिंता वाढणे किंवा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संयम राखणे आणि वाद टाळणे आवश्यक ठरू शकते. (Vaidhriti yoga effects)
धनु (Sagittarius) राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक बाबतीत आव्हान निर्माण करू शकतो. अचानक खर्च वाढल्यामुळे बचतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात मोठे आर्थिक निर्णय टाळणे हितावह मानले जाते. याशिवाय आरोग्याच्या बाबतीत हाडे किंवा सांधेदुखीशी संबंधित समस्या जाणवू शकतात, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.






