‘या’ जिल्ह्यांतील थंडी वाढली!

On: December 30, 2022 3:40 PM
---Advertisement---

मुंबई | या वर्षी हिवाळ्यात(Winter) असं जाणवत आहे की, मध्येच कडाक्याची थंडी पडत आहे तर मध्येच उकाडा जाणवत आहे. त्यामुळं वातावरणातील(Weather Update)हे बदल सहजच दिसून येत आहेत.

त्यातच गोंदियाचे कमाल आणि किमान तापमान(Temperature) सर्वात कमी नोंदवलं गेलं आहे. त्यामुळं विदर्भात कडाच्याची थंडी जाणवत आहे. तसेच नागपूरातही तापमानात घट झाल्याने थंडी पडली आहे.

विदर्भासह नाशिक, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांतही तापमानत घट झाल्याने थंडी वाढली आहे. तसेच सातार जिल्ह्याच्या तापमानातही घट झाल्याने तिथंही कडाक्याची थंडी पडली आहे.

तसेच मुंबईमध्येही जाणवत आहे. मराठवाड्यातही थंडी वाढली आहे. सध्या वातावरणात संमिश्र बदल झाल्याचे सातत्यानं दिसत आहे.

दरम्यान, कडाक्याची थंडी पडली असतानाच महाराष्ट्राच्या शेजारील काही राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. केरळ, कर्नाटक,नागालॅंड या राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now