Mahakumbh l प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या महाकुंभातील (Mahakumbh) दुसऱ्या अमृत स्नान महोत्सवानिमित्त (Amrit Snan Mahotsav) मौनी अमावस्येपूर्वी (Mauni Amavasya) संगमावर (Sangam) चेंगराचेंगरीची (Stampede) दुर्दैवी घटना घडली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे, मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अनेक जण जखमी (Injured) झाल्याची माहिती असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
चेंगराचेंगरीनंतर संगमावर विदारक दृश्य पाहायला मिळाले. घटनास्थळी अनेकांचे सामान, चपला, कपडे विखुरलेले दिसून आले. यामध्ये काहींचे सामान हरवले तर काहींनी आपला जीव गमावला. अनेक जण बेपत्ता (Missing) झाल्याची माहिती असून, त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर टीका :
एका वृत्तवाहिनीशी बोलताना एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “प्रशासनाने संगमासाठी एकच मार्ग (Single Route) तयार केला होता. त्यामुळेच ही दुर्घटना घडली. अचानक काही महिला खाली पडल्या आणि त्यांना मदत करताना दुसऱ्या बाजूलाही चेंगराचेंगरी झाली. संगमावर जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने लोक इकडे-तिकडे पळण्याचा प्रयत्न करत होते आणि परिस्थिती आणखी बिघडत गेली.”
“एकमेकांच्या अंगावरून गेले लोक” :
दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “लोकांचा जमाव संगमाकडे जात होता. यावेळी काही लोक जमिनीवर बसले होते. मात्र, चेंगराचेंगरीत लोक एकमेकांवर पाय देऊन, उड्या मारून जाऊ लागले. तेथे उपस्थित असलेले पोलीसही (Police) मागे हटले आणि त्यांनी लोकांना त्याच परिस्थितीत सोडले. अशी दुर्घटना घडू नये म्हणून किमान तशी यंत्रणा असायला हवी होती.”
Mahakumbh l रात्री दीडच्या सुमारास घडली घटना :
मंगळवारच्या रात्री दीडच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाल्याचे एका भाविकाने (Devotee) सांगितले. “लोक झोपले होते आणि पलीकडून जमाव आला आणि चेंगराचेंगरी झाली. बॅरिकेडिंगवर (Barricading) पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, मात्र गर्दी पाहून ते देखील मागे हटले. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला,” असे तो म्हणाला. घटनेनंतर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका (Ambulances) घटनास्थळी पोहोचल्या.
अधिकृत आकडेवारीची प्रतीक्षा :
या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी (Official Figures) प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेने महाकुंभाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






