सावधान! उन्हाचा तडाखा वाढला; दुपारी घराबाहेर पडण्यापूर्वी ‘हे’ वाचा, हवामान विभागाचा कडक इशारा!

On: March 4, 2026 12:07 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. कधी पावसाच्या सरी तर कधी प्रखर ऊन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) काही जिल्ह्यांसाठी उष्ण आणि दमट वातावरणाचा येलो अलर्ट जाहीर करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तापमानात झपाट्याने वाढ, अकोल्यात उच्चांकी नोंद :

गेल्या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसामुळे गारवा जाणवत होता; मात्र आता वातावरणाने अचानक कलाटणी घेतली असून उष्णतेची तीव्रता वाढली आहे. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला (Akola) येथे झाली असून तेथे पारा 38.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. मुंबई (Mumbai) आणि कोकण पट्ट्यातही उकाड्यासोबत दमट हवामान जाणवत आहे. दुपारनंतर सूर्यकिरणांचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचे नागरिक अनुभवत आहेत. (Maharashtra Weather Update)

यंदा डिसेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागली होती; मात्र त्यापूर्वी नोव्हेंबरपर्यंत पावसाची मालिका सुरूच होती. देशातील काही राज्यांमध्ये अजूनही जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून काही ठिकाणी पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हवामानातील या बदलत्या स्वरूपामुळे उष्णतेचा परिणाम अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. विशेषतः दुपारी 1 नंतर बाहेर पडताना नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

Maharashtra Weather Update | पुण्यात 35 अंश पार; किनारपट्टी भागात दमट हवामान :

पुणे (Pune) शहरात सलग दोन दिवस कमाल तापमानाने 35 अंश सेल्सिअसची मर्यादा ओलांडली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव आता पूर्णपणे कमी झाल्यामुळे उष्णतेत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.

देशातील नीचांकी तापमान उत्तर प्रदेशातील अयोध्या (Ayodhya) येथे 10 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर राज्यातील किमान तापमान धुळे (Dhule) येथे 12.8 अंश सेल्सिअस होते. अमरावती (Amravati) आणि वर्धा (Wardha) येथेही तापमान 35 अंशांच्या पुढे गेले आहे. आज काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून त्यामुळे उकाडा अधिक जाणवू शकतो. पालघर (Palghar), ठाणे (Thane), मुंबई, कोकण (Konkan) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी अनावश्यकपणे दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

News title : Heatwave Alert in Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now