Heatwave | भारतात यंदा फेब्रुवारी महिन्यातच प्रचंड उष्णता जाणवली. आता पुढील दोन महीने उष्णता आणखी वाढण्याच्या अंदाज आहे. यामुळे तापमान 125 वर्षांचा विक्रम मोडू शकते. IIT बॉम्बे आणि IIT गांधीनगरच्या एका अभ्यासानुसार, जलवायु बदलामुळे ‘ला नीना’ प्रभाव कमी होत असल्याने तापमान अधिक वाढणार आहे. (Heatwave)
गुजरातमध्ये आधीच लूचा प्रभाव जाणवू लागला आहे. दिल्लीचे तापमान देखील 35°C च्या जवळ पोहोचत आहे. त्यामुळे 2025 हे सर्वांत उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे.
‘ला नीना’ प्रभाव कमी होत असल्यामुळे तापमान वाढ?
ला नीना प्रशांत महासागरातील समुद्राच्या तापमानावर परिणाम करून थंड हवामान निर्माण करतो. मात्र, जलवायु परिवर्तनामुळे याचा प्रभाव कमी होत आहे. 2024 मध्ये उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील पाणी सामान्यपेक्षा जास्त गरम राहिले, ज्यामुळे पुढील काही वर्षांत उष्णतेमध्ये अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.
पावसाच्या पद्धतीतही बदल?
लांबचलांब लूच्या लाटा आणि वाढते तापमान याचा पावसावर परिणाम होऊ शकतो.
2025 मध्ये पावसाचे प्रमाण आणि कालावधी अनिश्चित राहण्याची शक्यता आहे.
वृद्ध आणि लहान मुलांसाठी उष्णता अधिक धोकादायक ठरू शकते.
दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये तापमान वाढण्याचा इशारा
दिल्लीमध्ये रविवारी तापमान 32.8°C वर पोहोचले, जे सामान्यपेक्षा 4.4°C जास्त होते.
गुजरातमध्ये फेब्रुवारीतच लूचा प्रभाव जाणवू लागला.
महाराष्ट्रात तर उष्णतेचा पारा काही जिल्ह्यांत 35 च्याही पुढे गेलेला दिसून आला. (Heatwave)
उष्णतेपासून बचावासाठी उपाय
भरपूर पाणी प्या.
थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळा, विशेषतः दुपारच्या वेळी.
हलके आणि सुती कपडे परिधान करा.
वृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या.
यंदाची उन्हाळी लाट अत्यंत तीव्र असू शकते, त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Title : Extreme Heatwave Alert India May Witness Hottest Summer in 125 Years






