“अंधारात आमदारांना सुरतला पाठवलं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?”

On: December 7, 2022 1:12 PM
---Advertisement---

मुंबई | कर्जत जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खोचक ट्विट करून शिंदे-फडणवीस सरकारला चिमटे काढले आहे.

पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?, असा सवाल रोहित पवारांनी शिंदेंना केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आपल्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू… करू… केंद्राशी बोलू… ही मूळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही, असं रोहित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादाचा मुद्दा अधिक प्रभावी आणि आक्रमकपणे मांडला जात असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये.

या प्रकरणावर शरद पवारांनी देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now