मुंबईत आता सामान्यांनाही मिळणार हक्काचे घर; सरकारच्या या नव्या निर्णयाने घरांच्या किमती घटणार?

On: April 13, 2026 12:15 PM
Mumbai Housing
---Advertisement---

Mumbai Housing | मुंबईसारख्या स्वप्ननगरीत स्वतःचे घर असणे हे प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचे मोठे स्वप्न असते. मात्र वाढत्या घरांच्या किमतींमुळे हे स्वप्न अनेकांसाठी अपूर्णच राहते. आता मात्र मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने परवडणाऱ्या घरांसाठी मोठा निर्णय घेतला असून, यामुळे मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना मोठा फायदा होणार आहे.

सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणावर स्मार्ट टाऊनशिप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील घरांच्या किमतींवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे आणि सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

प्रकल्प कुठे आणि कसा होणार? :

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बोरिवली पश्चिम येथे उभारण्यात येणार आहे. गोराई आणि शिंपोली परिसरातील सुमारे २८.८४ एकर जागेवर ही भव्य टाऊनशिप उभी राहणार आहे. या जमिनींपैकी काही भाग BSNL आणि MTNL यांच्या मालकीचा होता, मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून हा अडथळा दूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी या प्रकल्पाला मंजुरी देत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ७२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या परवडणाऱ्या गृहप्रकल्पांपैकी एक ठरणार आहे.

Mumbai Housing | आधुनिक सुविधा आणि उत्तम कनेक्टिव्हिटी :

ही टाऊनशिप केवळ घरांचा प्रकल्प नसून, एक संपूर्ण स्मार्ट जीवनशैली देणारी योजना आहे. येथे ४५० चौरस फुटांची घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये शाळा, रुग्णालये, खेळाची मैदाने आणि कौशल्य विकास केंद्र यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

याशिवाय, या प्रकल्पाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे उत्तम कनेक्टिव्हिटी. मेट्रो स्थानकांच्या जवळ असल्यामुळे प्रवास सोपा होणार आहे. तसेच प्रस्तावित वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबई आणि अंधेरीसारख्या भागांमध्ये जलद पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होऊन जीवन अधिक सुलभ होईल.

सरकारच्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे भूमिपूजन पुढील २ ते ३ महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ३ ते ४ वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करून घरांचा ताबा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांचे घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याची आशा निर्माण झाली आहे.

News Title : Affordable Housing in Mumbai: Government Announces Smart Township in Borivali under PMAY

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now