‘या’ कारणास्तव 23 जुलैला महाराष्ट्र बंद? दिल्ली आंदोलनाचे राज्यात पडसाद

On: July 21, 2026 7:16 PM
Maharashtra Bandh
---Advertisement---

Maharashtra Bandh | दिल्ली (Delhi) येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान, विविध विरोधी पक्षांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याने या प्रकरणाला अधिक राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

प्रकाश आंबेडकरांची बंदची घोषणा :

दिल्लीतील जंतर-मंतर (Jantar Mantar) आणि संसद परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि समाजातील विविध घटकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

दिल्लीतील आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर त्याचे पडसाद राज्यातही उमटू लागले आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईमुळे जनतेमध्ये नाराजी असल्याचा दावा करत, या मुद्द्यावर व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे 23 जुलैच्या महाराष्ट्र बंदकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Bandh | विरोधकांचा वाढता पाठिंबा :

नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आंदोलनाला आता विविध विरोधी पक्षांकडून पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस (Indian National Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आपल्या खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या तसेच विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत चिंता व्यक्त केली.

दरम्यान, महाराष्ट्रातील विविध ठिकाणीही आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला जात आहे. अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. पावसातही आंदोलन सुरू ठेवत आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्लीतील घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

News Title: Maharashtra Bandh Over Delhi Protest

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now