Aishwarya Rai | संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित आणि सलमान खान (Salman Khan), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) व अजय देवगण (Ajay Devgn) यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या आयकॉनिक चित्रपटाला आज २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाच्या निर्मितीदरम्यानचे अनेक खास क्षण आणि गुपिते उघड केली आहेत.
काय म्हणाले संजय लीला भन्साळी?
भन्साळी यांनी ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Rai) कामाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “ऐश्वर्या माझ्यासाठी एक परिपूर्ण ‘नंदिनी’ होती. माझ्या मनात असलेल्या पात्राला तिने हुबेहूब साकारले. माझ्या कल्पनेशी तिचे काम तंतोतंत जुळले आणि दिग्दर्शकाच्या प्रवासात असा अनुभव मिळणे दुर्मिळ असते.”
चित्रपटाच्या सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना भन्साळी यांनी सांगितले की, तिथे सर्वांमध्ये एक आपुलकीचे आणि प्रेमाचे नाते होते. “झोहरा सेहगलजी , हेलन आंटी, सलमान, ऐश्वर्या, स्मिता जयकर आम्ही सर्व एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे होतो. दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाच्या शूटिंगवेळी मला इतका आनंददायी अनुभव मिळाला नाही,” असे त्यांनी नमूद केले. मुलाखतीत भन्साळी यांनी सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील नात्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, “सेटवर हवेत प्रेम नक्कीच होते.” या दोघांना चित्रपटाच्या शेवटी एकत्र आणण्यासाठी प्रेक्षकांकडून खूप दबाव होता, असेही त्यांनी मान्य केले.
एक ‘कल्ट क्लासिक’ आणि प्रेमाची चर्चा
१९९९ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट भव्यता, संगीत, दिग्दर्शन, कथा आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रचंड गाजला. आज हा चित्रपट ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जातो आणि त्याने प्रेमकथांसाठी एक नवीन मापदंड स्थापित केला. या चित्रपटामुळे भन्साळी यांची गणना राज कपूर (Raj Kapoor), के. आसिफ (K. Asif) आणि गुरु दत्त (Guru Dutt) यांसारख्या महान दिग्दर्शकांमध्ये केली जाते.






