Vaibhav Sooryavanshi | आयपीएल (IPL) 2026 हंगामात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) पराभवानंतर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. फायनलच्या अगदी उंबरठ्यावर असताना संघाचे आव्हान संपुष्टात आल्याने त्याला निराशा झाली. क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थानवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यानंतर वैभवच्या चेहऱ्यावरची खंत स्पष्टपणे दिसून आली.
राजस्थानचा प्रवास थांबला :
चंदीगड (Chandigarh) येथे झालेल्या या महत्त्वाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत 214 धावांचा मोठा स्कोअर उभारला. या डावात वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आक्रमक खेळी साकारत 96 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या फलंदाजीमुळे राजस्थानने गुजरातसमोर 215 धावांचे आव्हान ठेवले होते. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या वैभवकडून या सामन्यातही मोठी अपेक्षा होती आणि त्याने त्या अपेक्षा पूर्ण केल्या.
Out of the park, a win in the bag 👊@gujarat_titans reach the final in a sublime fashion 🤩💙
Scorecard ▶️ https://t.co/eupS8cBPc2#TATAIPL | #Qualifier2 | #TheFinalLeap | #GTvRR pic.twitter.com/zM5Zh9nUc7
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2026
मात्र गुजरातच्या फलंदाजांनी हे लक्ष्य सहज गाठले. संघाने 8 चेंडू बाकी ठेवून आणि 7 विकेट राखून विजय मिळवला. राहुल तेवतिया (Rahul Tewatia) याने विजयी चौकार ठोकताच राजस्थानच्या यंदाच्या हंगामाचा शेवट झाला. सामना संपल्यानंतर कॅमेऱ्याचे लक्ष वैभवकडे गेले. पराभवामुळे तो स्पष्टपणे नाराज दिसत होता. वरिष्ठ खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) त्याच्याशी संवाद साधत त्याला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसले.
Vaibhav Sooryavanshi | भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण :
सामन्यानंतर बराच वेळ जाडेजा आणि वैभव यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर वैभव थेट डगआऊटकडे गेला. त्याने गुजरातच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. डगआऊटमध्ये बसल्यानंतर त्याने टोपीच्या सहाय्याने आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या डोळ्यांत अश्रू आल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. फायनलच्या इतक्या जवळ जाऊन संघाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने त्याला हा पराभव मनाला लागल्याचे दिसून आले.
या हंगामात वैभव सूर्यवंशीने राजस्थानसाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 776 धावा करत संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याची सरासरी 48.5 राहिली, तर तब्बल 72 षटकार त्याने ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट 237.31 इतका प्रभावी होता. विशेष म्हणजे मागील चार सामन्यांमध्ये त्याची तीन शतके हुकली. लखनऊ (Lucknow) विरुद्ध तो 93 धावांवर बाद झाला होता, तर हैदराबाद (Hyderabad) विरुद्ध 97 आणि गुजरातविरुद्ध 96 धावांवर त्याची खेळी संपली. त्यामुळे वैयक्तिक टप्पे आणि संघाचे फायनलचे स्वप्न दोन्ही हुकल्याने त्याची निराशा अधिक वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.






