सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी!

On: March 27, 2025 7:07 PM
tembhu-mhaisal-yojana
---Advertisement---

Sangola | सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी आणि पाणीटंचाईवर उपाय म्हणून येत्या १० एप्रिलपासून टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. या पाण्याद्वारे माण आणि कोरडा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे.

जलसंपदा मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगोला तालुक्यासाठी टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे आवर्तन १० एप्रिलपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांगोल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर व इतर आमदारांची उपस्थिती होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील पाणी प्रश्नांवर चर्चा झाली.

वीस गावांना दिलासा; बंधारे होतील भरले

टेंभू योजनेचे पाणी माण नदीमध्ये सोडल्यानंतर सांगोला तालुक्यातील वीस गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे यांसारख्या गावांमध्ये यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

पाण्याअभावी मरगळलेल्या शेतीसाठी हे आवर्तन महत्त्वाचे ठरणार असून, शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील शेवटचा टप्पा पार पाडण्यासाठी आधार मिळेल. टंचाईग्रस्त भागांतील बंधाऱ्यांना जिवदान मिळेल आणि अनेक गावांची पाण्याची टंचाईही दूर होईल, असा विश्वास चेतनसिंह सावंत यांनी व्यक्त केला आहे.

 Title: Tembhu Water Supply to Sangola from April 10

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now