Aishwarya Rai | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं होतं. आज देखील ऐश्वर्या रायच्या चित्रपटांची चर्चा होत असते. ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्या ब्रेकअपच्या चर्चां रंगल्यात. ऐश्वर्या आणि सलमान खान यांच एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, काही कारणांमुळे या दोघांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये बोलत सलमानबाबत ऐश्वर्याने खुलासा केला होता.
काय म्हणाली ऐश्वर्या?
मुलाखतीमध्ये बोलत असताना ऐश्वर्या (Aishwarya Rai) म्हणाली की, सलमान मला मारहाण करायचा शिवाय तो शिवीगाळ देखील करायचा. मात्र सलमानने एका मुलाखतीत हे सगळे आरोप फेटाळून लावले. पुढे ती म्हणाली की, सलमान दारु पिऊन धिंगाणा घालायचा. एवढंच नव्हेतर तिचा त्याने अनेकदा अपमानही केला.
मी कामावर असं जायचे जसं काही घडलंच नाही. जेव्हा मी सलमान खानचे फोन उचलण्याचं बंद केलं तेव्हा सलमानने मला मारहाण करायला सुरुवात केली आणि शारीरिक दुखापत केली. आणि म्हणूनच मी कोणत्याही स्वाभिमानी स्त्रीप्रमाणे त्याच्यासोबतचे सगळे संबध तोडलं. आमचं नातं याचमुळे तुटलं, असं तिने सांगितलं.
Aishwarya Rai चा खुलासा
या आधी ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि बाॅलिवूडचा भाईजान सलमान हे रिलेशनमध्ये होते. मात्र आता त्यांच्या ब्रेकअपबद्दल महत्त्वाची माहिती समोर येत आहे. एका मुलाखती दरम्यान ऐश्वर्याने याबाबत मोठा खुलासा केला होता. ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्यामध्ये कोणत्या कारणामुळे दुरावा आला हे या ऐश्वर्याने सांगितलं आहे.
News Title : Aishwarya rai talks about salman khan
महत्त्वाच्या बातम्या-
“हारकर जितने वाले को बाजीगर कहते है”, सुनेत्रा पवारांच्या बॅनरबाजीची जोरदार चर्चा
‘या’ गोष्टी बायकोसमोर करणं टाळा, अन्यथा पती होईल उद्ध्वस्त
‘त्या’ बॅनरमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठी खळबळ; थेट राणेंना इशारा?
आनंदवार्ता! सोने-चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा, ‘इतक्या’ घरसल्या किंमती






