Weather Updates | राज्यातील अनेक भागांत थंडीचा कडाका आता कमी होताना दिसत असतानाचं, हवामान विभागाने (Indian Meteorological Department) नवीन अंदाज वर्तवला आहे. विशेषतः मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि ठाणे (Thane) परिसरात पहाटेच्या वेळी जाणवणारा गारवा कायम असला, तरी दुपारच्या सुमारास तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना काहीसा उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. आगामी काळात वातावरणात मोठे बदल होण्याची शक्यता दिसुन येत आहे.
कोकण किनारपट्टी आणि मुंबईतील हवामानाची स्थिती
मुंबई शहरासह लगतच्या पालघर (Palghar) आणि संपूर्ण कोकण (Konkan) पट्ट्यात सकाळच्या प्रहरी पारा २० ते २२ अंश सेल्सिअसच्या (Weather Updates) दरम्यान नोंदवला जात आहे. थंडीची तीव्रता वाढण्याऐवजी ती सध्या स्थिर असून आर्द्रतेमुळे या भागात कडाक्याच्या थंडीचा अभाव आहे. समुद्राकडून वाहणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे रात्रीच्या वेळीही वातावरणात फारसा बदल जाणवत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
दुसरीकडे, दिवसाच्या तापमानाचा विचार करता, सूर्याच्या उष्णतेमुळे पारा ३१ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वर जात आहे. यामुळे मुंबईकरांना दुपारच्या वेळी घामाच्या धारा आणि उन्हाचा चटका जाणवत आहे. ठाणे आणि नवी मुंबई (Navi Mumbai) भागातही हेच चित्र असून तेथे पहाटे हलका गारवा असला तरी किमान तापमान १८ ते २० अंशांच्या दरम्यान रेंगाळत आहे, ज्यामुळे दिवसाचे वातावरण उबदार राहते.
Weather Updates | पुणे शहर आणि परिसरातील गारठ्याची स्थिती
पुणे आणि आसपासच्या भागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत थंडीचा जोर आता ओसरलेला पाहायला मिळत आहे. आज सकाळी पुण्यात हलका गारवा जाणवला असला, तरी किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावले आहे. थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यामुळे पुणेकरांना पहाटेच्या वेळी जाणवणारा तीव्र बोचरा वारा आता अनुभवता येत नाही.
पुण्यातील दैनंदिन हवामानाचा (Weather Updates) पॅटर्न पाहिल्यास, दुपारी पारा २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. यामुळे सकाळी स्वेटर घालणाऱ्या नागरिकांना दुपारी मात्र उष्णतेमुळे सुती कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. कल्याण (Kalyan) आणि उपनगरांतही हवामान स्थिर असून हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील तापमानात अशाच प्रकारचा चढ-उतार कायम राहण्याचे संकेत आहेत.






