बंगळूरु घटनेने विराट कोहलीला धक्का: ११ जणांच्या मृत्यूवर दिली पहिली प्रतिक्रिया

On: June 5, 2025 9:36 AM
Virat Kohli
---Advertisement---

Virat Kohli | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान घडलेली चेंगराचेंगरीची घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ठरली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर घडली असून, यावर आता विराट कोहली याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहली आणि RCB संघाची अधिकृत प्रतिक्रिया :

काल चिन्नास्वामी स्टेडियममध्ये RCBच्या विजयाचं उत्साहात सेलिब्रेशन सुरु असताना, बाहेर हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी झाली होती. या गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर विराट कोहलीने एक भावनिक प्रतिक्रिया देत म्हटलं, “माझं मन मोडलंय… मी निशब्द झालोय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

RCB संघाने देखील याबाबत शोक व्यक्त करत एक अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. “दुर्घटनेबद्दल आम्हाला माध्यमांद्वारे माहिती मिळाली. या घटनेमुळे आम्हाला अत्यंत दु:ख झालं आहे. आम्ही आमच्या शेड्यूलमध्ये तात्काळ बदल केला असून, प्रशासनाच्या सूचना आणि सल्ल्याचं पालन केलं. आमच्या सर्व चाहत्यांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करतो,” असं आरसीबीने स्पष्ट केलं.

Virat Kohli | सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, हरभजन सिंग यांचीही प्रतिक्रिया :

या घटनेने अनेक माजी क्रिकेटपटूंनाही भावुक केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर लिहिलं, “जे घडलं ते अकल्पनीय आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. ईश्वर सर्वांना शांतता आणि शक्ती देवो.”

अनिल कुंबळे म्हणाले, “हा दिवस क्रिकेटसाठी अत्यंत दु:खद आहे. विजय साजरा करताना प्राण गमावलेल्यांची आठवण मन सुन्न करणारी आहे.” तर हरभजन सिंग यांनी लिहिलं, “चाहत्यांच्या अशा प्रकारे मृत्यूने मी व्यथित झालो आहे.”

News Title: Virat Kohli Reacts to Bengaluru Stampede Deaths; Emotional Message as 11 Fans Die at RCB Victory Parade

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now