फळभाज्यांचे दर कडाडले; भाव गेले थेट शंभरी पार

Vegetable Price  | सध्या राज्याभरात मान्सून दाखल दाखल झाला आहे. यामुळे आता फळभाज्यांच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. तसेच फळभाज्यांच्या किंमतीत (Vegetable Price) वाढ होताना दिसत आहेत. काही फळभाज्यांच्या दराने शतक पूर्ण केलं आहे. याचा फायदा हा शेतकऱ्यांना नक्कीच होईल. शहरांसह ग्रामीण भागातही फळभाज्यांच्या दरात वाढ (Vegetable Price) झाली आहे. टॉमॅटो, कांदे तसेच बटाट्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

भाव कसे आहेत?

यंदाच्या वर्षी उन्हाळ्यामुळे पिकांचे म्हणावं असं उत्पादन झालं नाही. यामुळे पिकांचे उत्पादन घटल्याचं दिसून आलं आहे. आता भाजीपाल्यांचे भाव वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. टोमॅटोचा भाव हा सध्या 130 रूपये आहे. तर कांद्याची किंमत ही 90 रूपयांवर गेली आहे. तर भाजीपाल्यासहीत इतर खाद्यान्नाच्या किंमतीत चांगलीच वाढ झाली. टोमॅटोच्या किंमतींनी देशात शतक ठोकले आहे. (Vegetable Price)

2 जुलै रोजी बटाट्याचा भाव हा 80 रू किलो होता. तर कांद्याचा भाव हा 90 रूपये. टोमॅटो 130 किलो रूपये, कांदा 45 ते 50 रुपये किलो दराने विक्री होत होता. बटाट्याची आधी किंमत ही 10 ते 12 रूपये किलो होती. तो भाव आता 40 रूपये किलोवर पोहोचला आहे. भाजीपाल्याचे दर हे आता गगनाला पोहोचले आहेत. (Vegetable Price)

भाजीपाल्याचे सरासरीपेक्षा दर हे अधिक आहे. उत्तर भारतात टोमॅटो महागला आहे. तर कांदा हा 45 ते 50 रूपये किलो दराने विक्री होत होता. तर बटाट्याची किंमत देखील वाढल्याचं चित्र आहे.  देशातील भाजीपाल्याचे दर हे आकाशाला भिडले आहेत.

उष्णतेच्या लाटांमुळे भाजीपाल्यांचे नुकसान झाले तर आता पावसामुळे भाजीपाल्यासह डाळींच्या किंमतीत वाढ झाली. बटाटे, टोमॅटो, कांदे आणि लसूण यासह इतर भाजीपाल्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

News Title – Vegetable Price Increase News Update

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी; बजेटमध्ये PF संदर्भात होणार मोठा निर्णय?

“मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या”; मराठा संघटनांची मागणी

राहुल गांधीही करणार विठू नामाचा गजर; शरद पवारांनी दिलं पंढरपूर वारीचं निमंत्रण

उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता; शिक्षण फक्त दहावी

गणेशोत्सवाला एसटीने कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!