Twinkle Khanna | बॉलिवूड अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचं वक्तव्य ‘फिजिकल बेवफाई’वर (Physical Infidelity) दिलेलं असून, नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. अक्षय कुमारची पत्नी असलेली ट्विंकल ‘टू मच’ (Too Much) या टॉक शोमध्ये अभिनेत्री काजोल, जान्हवी कपूर आणि दिग्दर्शक करण जोहरसोबत उपस्थित होती. या शोमध्ये ‘फिजिकल आणि इमोशनल बेवफाई’ या विषयावर चर्चा रंगली.
चर्चेदरम्यान ट्विंकल खन्नानं “रात गई बात गई…” असं वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर तिच्या विधानावर टीका होत आहे. काहींनी ट्विंकलच्या मताशी असहमती दर्शवली असून, “विश्वासघात म्हणजे नातं संपलं” असं म्हणत तिला ट्रोल करण्यात आलं.
‘फिजिकल बेवफाई’वर ट्विंकलचं मत :
‘टू मच’ शोच्या नव्या भागात करण जोहर, काजोल आणि जान्हवी कपूर हे पाहुणे होते. एका राउंडमध्ये त्यांना विचारलं गेलं की – ‘फिजिकल बेवफाई’ आणि ‘इमोशनल बेवफाई’ यात कोणती अधिक गंभीर आहे? जान्हवी कपूरनं उत्तर दिलं की “फिजिकल बेवफाई म्हणजे नातं तुटणं.” मात्र, करण जोहर, काजोल आणि ट्विंकल या तिघांनी याला विरोध करत “इमोशनल बेवफाई ही अधिक गंभीर आहे” असं म्हटलं.
ट्विंकल पुढे म्हणाली, “आपण ५० च्या दशकात आहोत, ती २० च्या दशकात आहे. ती अजून अनुभव घेत आहे. आम्ही जे पाहिलंय, ते तिनं पाहिलेलं नाही. रात गई बात गई…” या वक्तव्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला. अनेकांनी ट्विंकलचं हे वक्तव्य ‘नात्यातील प्रामाणिकतेचा अपमान’ असल्याचं म्हटलं.
Twinkle Khanna | नेटकऱ्यांचा संताप आणि ट्विंकलवर टीका :
या वक्तव्यावर ट्विंकल खन्ना ट्रोल होत आहे. एका युजरनं लिहिलं, “जर बेवफाई क्षम्य असेल, तर लग्नाचा अर्थच काय?” तर दुसऱ्यानं कमेंट केली, “कदाचित बॉलिवूडच्या पत्नींसाठी हे सामान्य असेल!” काहींनी ट्विंकलला “डबल स्टँडर्ड्स” आणि “अवास्तव विचारांची व्यक्ती” असं म्हटलं.
शोचा क्लिप व्हायरल झाल्यानंतर ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर ट्विंकल आणि अक्षय कुमार दोघेही ट्रेंडिंगमध्ये आले. बरेच नेटकरी म्हणत आहेत की, ट्विंकलचं वक्तव्य “विवाह संस्थेचा अपमान” आहे. काहींनी मात्र तिचं मत ‘प्रॅक्टिकल’ असल्याचं समर्थन केलं.
अक्षय कुमारसोबतचं ट्विंकलचं लग्न आणि जुनी नाती :
ट्विंकल खन्नानं 2001 मध्ये अभिनेता अक्षय कुमारशी लग्न केलं. लग्नापूर्वी अक्षय कुमारचं अभिनेत्री रवीना टंडन आणि शिल्पा शेट्टीसोबतचं नातं चर्चेत होतं. अक्षयची “प्लेबॉय” इमेज त्या काळी चर्चेचा विषय बनली होती. ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये ट्विंकलनं एकदा म्हटलं होतं की, ती अक्षयसोबतच्या नात्याबद्दल सुरुवातीला अजिबात गंभीर नव्हती.
काजोल आणि अजय देवगण यांच्या लग्नाचं उदाहरण देत ट्विंकलनं शोदरम्यान सांगितलं की, “प्रेम टिकवण्यासाठी सुसंगतता आवश्यक असते, पण कधी कधी नात्यात चुका दुर्लक्ष केल्याने बंध अधिक मजबूत होतात.”






