“RSS वर बंदी घालण्याचा विचार करणारे मूर्ख आणि राष्ट्रद्रोही”; मंत्री बावनकुळे भडकले

On: October 23, 2025 7:28 PM
Chandrashekhar Bawankule
---Advertisement---
Chandrashekhar Bawankule | भंडारा जिल्ह्यातील एका पत्रकार परिषदेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याच्या चर्चेबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडे काही राजकीय नेत्यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

“संघाने देशात राष्ट्रभावना जागृत केली”

यावर भाष्य करताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्टपणे सांगितलं की “आरएसएसवर बंदी घालण्याचा विचार करणारे लोक मूर्ख आणि राष्ट्रद्रोही आहेत.” त्यांनी म्हटलं की, संघाने (RSS) देशात राष्ट्रभावना जागृत केली, सामाजिक एकोपा वाढवला आणि समाजसेवेचा एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे अशा संघटनेवर बंदी घालण्याचा विचार हा देशाच्या हिताविरुद्ध असल्याचं ते म्हणाले.

बावनकुळे पुढे म्हणाले की, “संघ हा भारताच्या विकासाचा, संस्कृतीचा आणि राष्ट्रभक्तीचा आधारस्तंभ आहे. ज्यांना संघाचं कार्य माहीत नाही, तेच असे अविचारी वक्तव्य करतात.” त्यांनी विरोधकांवर टीका करत म्हटलं की, काही लोक फक्त राजकीय फायद्यासाठी संघाचं नाव वापरतात, पण त्यांच्या कार्याचं वास्तव त्यांना कधी समजत नाही. संघाने (RSS) कोरोना काळात, पूरग्रस्त भागात आणि विविध सामाजिक उपक्रमांत जे योगदान दिलं, त्याची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

Chandrashekhar Bawankule | “सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे”

या वेळी बावनकुळे यांनी विरोधकांकडून येणाऱ्या इतर आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं. विशेषतः शेतकरी पॅकेज आणि मतदारांबाबतच्या टीकांवर त्यांनी म्हटलं की, “महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. राज्यात शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर केलं आहे, परंतु विरोधकांना फक्त टीका करण्यातच रस आहे. ते कोणतंही ठोस उपाय सुचवत नाहीत.”

महसूलमंत्र्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात संघावरील (RSS) राजकीय वाद चिघळण्याची शक्यता आहे. बावनकुळे यांच्या विधानाला समर्थन देणारे अनेक नेते पुढे येत आहेत, तर काही विरोधकांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र बावनकुळे ठामपणे म्हणाले की, “संघावर टीका करणं म्हणजे भारताच्या संस्कृतीवर टीका करणं आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत.

News Title- “Those who are thinking of banning RSS are fools and traitors” 

Join WhatsApp Group

Join Now