Raj Thackeray | राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा (State School Curriculum Framework 2024) नुसार महाराष्ट्रातील (Maharashtra) शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी (Hindi) भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena – MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही सक्ती खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध
नवीन शैक्षणिक धोरणाच्या (New Education Policy) अंमलबजावणीचा भाग म्हणून राज्यात पहिलीपासून मराठी (Marathi) आणि इंग्रजी (English) सोबत हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र या निर्णयावर राज ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.
“मी स्वच्छ शब्दांत सांगतो की, ही भाषेची सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजिबात खपवून घेणार नाही,” असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Raj Thackeray | भविष्यातील सक्तीची भीती
राज ठाकरे यांनी या निर्णयावर केवळ तात्कालिक विरोध न दर्शवता भविष्यातील धोक्याकडेही लक्ष वेधले आहे. “आज ते भाषेची सक्ती करत आहेत, उद्या आणखी कशाची तरी सक्ती करतील, नवीन फतवे काढतील,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
“म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो!” या म्हणीचा वापर करत त्यांनी म्हटले की, अशा प्रकारची सक्ती भविष्यात आणखी वाढू शकते आणि हे योग्य नाही. हा एकप्रकारे केंद्र सरकारला (Central Government) दिलेला इशारा मानला जात आहे.






