Indus Water Treaty | भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानमधील (Pakistan) नेतेमंडळींकडून युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. माजी खासदार फैसल वावडा यांनी पाण्यावरून युद्ध लढण्याची आणि त्यात कोणतीही तडजोड न करण्याची भाषा केली आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्याला पोकळ बडबड मानले जात आहे.
पाण्याच्या मुद्यावर युद्धाची धमकी
पहलगाम (Pahalgam) हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान (India-Pakistan) संबंध ताणले गेले आहेत. भारताने सिंधू जल करार निलंबित केल्यानंतर पाकिस्तानने (Pakistan) याला ‘युद्धाची तयारी’ म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर, एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना फैसल वावडा (Faisal Vawda) यांनी आक्रमक भूमिका घेतली. “आमचे लष्करप्रमुख स्पष्ट म्हणाले आहेत की, आम्ही पाण्याच्या मुद्यावर युद्ध लढू आणि कोणतीही तडजोड करणार नाही,” असे वावडा म्हणाले.
त्यांनी पुढे इशारा दिला की, “आम्ही इतके पुढे जाऊ की माघार घेणे कठीण होईल. युद्ध झाल्यास ते फक्त भारत-पाकिस्तानपुरते (India-Pakistan) मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण प्रदेशात पसरेल आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला हस्तक्षेप करावा लागेल.”
संरक्षण बजेटमध्ये मोठी तफावत
वावडा (Vawda) एवढ्यावरच न थांबता म्हणाले, “जेव्हा विषय पाण्यावर येईल, तेव्हा पाकिस्तान (Pakistan) वाट पाहणार नाही, तर तात्काळ प्रतिक्रिया देईल. आम्ही सुरुवात करू.” त्यांनी पाकिस्तानच्या (Pakistan) लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कथित सामर्थ्याचे गोडवे गायले. “एअरफोर्स माशासारखे पकडून मारते,” अशी पोकळ बढाई त्यांनी मारली. (ARY News)
मात्र, वास्तव वेगळे आहे. भारताची (India) सामरिक आणि तांत्रिक क्षमता पाकिस्तानपेक्षा (Pakistan) अनेक पटींनी अधिक आहे. संरक्षण खर्चातही मोठी तफावत आहे. भारताचे (India) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचे संरक्षण बजेट ७९ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे, तर पाकिस्तानचे (Pakistan) बजेट या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे वावडा यांच्या धमक्या पोकळ असल्याचे मानले जात आहे.






