पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार रिजवानचं मोठं वक्तव्य, म्हणाला ‘सर्व काही…’

On: February 24, 2025 3:21 PM
Mohammad Rizwan
---Advertisement---

Mohammad Rizwan l ICC चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर (Pakistan) मात करत शानदार विजय मिळवला. दुबईतील (Dubai) इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर (International Cricket Stadium) झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानने (Pakistan) दिलेले २४२ धावांचे लक्ष्य सहज पार केले. विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकाच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले.

मोहम्मद रिजवानची प्रतिक्रिया:

सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) खूप निराश झाला. “सर्व काही संपलं. आता आमच्यासाठी काहीही शिल्लक नाही. आमचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. रिजवानने (Mohammad Rizwan) भारतीय फलंदाज विराट कोहलीचे (Virat Kohli) कौतुक केले. “विराटची फिटनेस आणि शिस्त वाखाणण्याजोगी आहे,” असे तो म्हणाला.

रिजवानने (Mohammad Rizwan) पुढे सांगितले की, “आम्हाला आता इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. एक कर्णधार म्हणून मला ही परिस्थिती अजिबात आवडत नाही. आमची ताकद आमच्यासोबत असायला हवी होती.” त्याने विराट कोहलीच्या (Virat Kohli) ५१ व्या शतकामुळेच भारताचा विजय शक्य झाला, हे मान्य केले.

Mohammad Rizwan l विराट कोहलीची प्रशंसा आणि पराभवाची कारणे:

मोहम्मद रिजवानने (Mohammad Rizwan) सांगितले, “विराटची (Virat Kohli) मेहनत पाहून मी थक्क झालो. तो फॉर्ममध्ये नाही, असे सगळे म्हणत होते, पण त्याने मोठ्या सामन्यात धावा केल्या.” पाकिस्तानच्या (Pakistan) पराभवाबद्दल बोलताना तो म्हणाला, “आम्ही सर्वच पातळ्यांवर चुका केल्या. मधल्या षटकांमध्ये धावा करू शकलो नाही.”

“आम्ही नाणेफेक जिंकली, पण त्याचा फायदा झाला नाही. २८० धावा चांगल्या ठरल्या असत्या, पण भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. खराब फटक्यांमुळे आमच्यावर दबाव आला,” असे त्याने सांगितले. तसेच, “जेव्हा तुम्ही हरता, तेव्हा तुमची कामगिरी चांगली नसते. आम्ही भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण तसे करू शकलो नाही. विराट आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी आमच्याकडून सामना हिरावून घेतला. आम्हाला क्षेत्ररक्षण सुधारण्याची गरज आहे,” असेही तो म्हणाला.

News Title: Pakistan Captain Rizwan Disheartened After Loss to India, Says ‘Everything is Over’

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now