Operation Sindoor | पहलगाम हल्ल्याच्या प्रतिशोधात भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईमुळे पाकिस्तानात (Pakistan) प्रचंड भीतीचे आणि अराजकतेचे वातावरण पसरले आहे. अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्यानंतर, आता तेथील मशिदींमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले जात आहे, ज्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होते.
भारताच्या कारवाईने पाकिस्तानात घबराट
जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ले केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असे नाव दिलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये कमालीची घबराट आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या कारवाईला भारताने दहशतवादाविरुद्ध उचललेले कठोर पाऊल म्हटले आहे.
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी छावण्या लक्ष्य केल्यानंतर, पाकिस्तानमधील (Pakistan) अनेक विमानतळांवर आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सीमेवरील तणाव वाढला असून, पाकिस्तानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मशिदींमधून सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन
भारताच्या (India) या धडक कारवाईनंतर, पाकिस्तानमधील (Pakistan) मशिदींमधून नागरिकांसाठी सतत महत्त्वपूर्ण घोषणा दिल्या जात आहेत. सध्या पाकिस्तानात (Pakistan) कमालीचे दहशतीचे वातावरण असून, मशिदींद्वारे लोकांना तात्काळ आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले जात आहे.
या काळात घरात कोणीही थांबू नये, अशा सूचना देण्यात येत आहेत. अनेक नागरिक आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणांच्या शोधात बाहेर पडले आहेत. सरकारनेच मशिदींना हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी धर्म विचारून २६ निष्पाप लोकांची हत्या केली होती, ज्याचा बदला घेण्यासाठी भारताने (India) काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सैन्याला मोकळीक दिली होती.
Title : Pak Mosques Urge Evacuation Post-Operation Sindoor






