Pahalgam | पहलगाम (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर काही घटकांकडून स्थानिक काश्मिरींना लक्ष्य केले जात असताना, प्रत्यक्षदर्शी पर्यटक अमरेंद्र कुमार सिंह (Amarendra Kumar Singh) यांनी स्थानिकांच्या मदतीचा अनुभव सांगत धर्मांधांना चपराक लगावली आहे. हॉटेल-गाडी मालकांनी पैसे घेतले नाहीत, पण विमान कंपन्यांनी मात्र अवाच्या सवा दर आकारल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
घोडेस्वाराने वाचवले प्राण, स्थानिकांची मोलाची मदत
अमरेंद्र कुमार सिंह हे आपल्या पत्नीसह (मोना) (Mona) जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) पर्यटनासाठी गेले होते. बैसरन व्हॅलीतील (Baisaran Valley) घटनास्थळापासून ते केवळ ३००-४०० मीटर अंतरावर असताना गोळीबार सुरू झाला. त्यांनी ट्विटरवर (Twitter) लिहिले की, गोळ्यांचे आणि लोकांच्या पळापळीचे आवाज ऐकून धोका ओळखला. त्यांच्या घोडेस्वाराने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढले.
हा त्यांच्या दौऱ्याचा पहिलाच दिवस होता. या घटनेनंतर त्यांनी तात्काळ दौरा रद्द करून परतीचे तिकीट काढले आणि सायंकाळच्या विमानाने परतण्यासाठी विमानतळाकडे प्रयाण केले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांसाठी, ज्यात किमान तीन घोडे मालक होते, त्यांनी दुःख आणि राग व्यक्त केला.
‘धर्म पुछा..’ म्हणणाऱ्यांना चपराक, एअरलाइनवर टीका
सिंह (Singh) यांनी ‘धर्म पुछा, जाति नही’ अशा प्रकारच्या विखारी प्रचारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “हजारो लोकांचे प्राण केवळ स्थानिक लोकांच्या मदतीमुळे वाचले. घोडे मालक, गाडी मालक, हॉटेल मालक यांचे सहकार्य उत्कृष्ट होते. हॉटेल आणि गाडी मालकाने पैसे घेतले नाहीत, ड्रायव्हर रडत होता, जबरदस्तीने टीप स्वीकारली.”
मात्र, दुसरीकडे ‘गिधाडे संधी शोधत असतात’ असे म्हणत त्यांनी विमान कंपन्यांवर निशाणा साधला. श्रीनगर (Srinagar) ते दिल्ली (Delhi) दोन तिकिटांसाठी त्यांना ३८,००० रुपये मोजावे लागले. त्यांनी सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केला; टेहळणीची माहिती असूनही सुरक्षा का नव्हती, असा सवाल त्यांनी केला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत राष्ट्राने एकजूट राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
Title : Pahalgam Survivor Slams Price Gouging, Communalism






