अवघे ३५ मिनिट अन् पाकिस्तानचा खेळ खल्लास! जाणून घ्या नेमकं काय घडलं

On: May 9, 2025 9:54 AM
India Pakistan Conflict
---Advertisement---

India vs Pakistan Conflict 2025 | पाकिस्तानच्या सलग हल्ल्यांना भारताने अवघ्या 35 मिनिटांत चोख उत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत त्यांच्या महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांचा फडशा पाडला आहे. भारताच्या अत्याधुनिक ‘इंटिग्रेटेड काऊंटर अनमॅन्ड एअरक्राफ्ट’ प्रणालीमुळे पाकिस्तानचे अनेक क्षेपणास्त्र आणि आत्मघातकी ड्रोन हवेतच निष्प्रभ ठरले.

तिन्ही सैन्य दलांचा संयुक्त जबरदस्त प्रतिहल्ला :

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने एकत्रित कारवाई करत लाहोर, कराची, इस्लामाबाद, सियालकोट, बहावलपूर, पेशावरसह पीओकेतील मुझफ्फराबाद आणि कोटली येथे जोरदार क्षेपणास्त्र हल्ला केला. विशेषतः लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यात आली आहे. पाकिस्तानने जम्मू, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील अनेक शहरांवर हल्ला केल्याने तिथं गुरुवारी रात्री ब्लॅकआऊट करण्यात आलं होतं.

भारतीय नौदलाने INS विक्रांतच्या साहाय्याने समुद्रमार्गे कराची बंदरावर 10 क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात कराची बंदर उद्ध्वस्त झालं असून इस्लामाबाद शहरालाही मोठं नुकसान झालं आहे. अरबी समुद्रात तैनात INS विक्रांतच्या प्रभावी कारवाईमुळे पाकिस्तानची समुद्री ताकद कोलमडली आहे.

India vs Pakistan Conflict 2025 | पूंछ, राजौरीत गोळीबार; भारताचे ठोस प्रत्युत्तर :

काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरु आहे. भारतानेही तिथं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सीमेलगतच्या गावांतील नागरिकांना बंकरमध्ये हलवण्यात आले आहे. दिल्ली, गुजरातसह उत्तर प्रदेश, हिमाचलमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशभरात 24 विमानतळ तातडीने बंद करण्यात आले आहेत.

भारताने पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न ‘या’ ठिकाणांहून हाणून पाडला?

काश्मीर: श्रीनगर, जम्मू, अवंतीपोरा, उधमपूर

पंजाब: पठाणकोट, अमृतसर, कपूरथळा, जालंधर, लुधियाना, भटिंडा, आदमपूर

राजस्थान: जैसलमेर, फलोदी, उत्तरलाई

गुजरात: भुज

News Title : India’s Fierce Strike Plan: Pakistan Crushed in 35 Minutes – Full Report in Marathi

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now