Rain Alert | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती. मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भाग कोरडे राहिले होते. पण आता भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. ४ आणि ५ सप्टेंबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासन यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy Rain Alert)
देशभरात सध्या पावसाने कहर केला असून पश्चिम बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांवर त्याचा परिणाम होत आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब येथे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra Rain Alert)
मुंबई व कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज :
हवामान तज्ज्ञांच्या मते, गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसांत मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढेल. आज मुंबईत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, मात्र उद्यापासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे किनारपट्टी भागात पुराचा धोका संभवतो.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत देखील पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. (Heavy Rain Alert)
Rain Alert | धरणे ओव्हरफ्लो, जायकवाडीतून मोठा विसर्ग :
राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याचा साठा धोक्याच्या मर्यादेपर्यंत भरला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण सध्या ९९ टक्के क्षमतेपर्यंत भरले असून सातत्याने पाण्याची आवक सुरू आहे. आतापर्यंत तीन वेळा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून तब्बल २५ टीएमसी पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे नांदेड परिसरात दोन वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती.
तथापि, या पाणलोटामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा दूर झाला असून सिंचन आणि औद्योगिक वसाहतींसाठीही पाणी उपलब्ध झालं आहे. मात्र, मुसळधार पाऊस कायम राहिल्यास धरण व्यवस्थापन व प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.






