Amruta Fadnavis | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचे नवे हिंदी भजन ‘कोई बोले राम राम कोई खुदाए’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. टी-सीरिजच्या (T-Series) बॅनरखाली रिलीज झालेल्या या गाण्यामधून त्यांनी सर्वधर्म समभावाचा संदेश दिला असून, त्यांच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘कोई बोले राम राम’
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या बँकर आणि सामाजिक कार्यकर्त्या असण्यासोबतच एक गायिका म्हणूनही ओळखल्या जातात. त्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात आणि आपल्या नवनवीन गाण्यांची माहिती चाहत्यांसोबत शेअर करतात. त्यांचे ‘कोई बोले राम राम कोई खुदाए’ हे गुरुदेवांवरील भजन टी-सीरिजच्या (T-Series) अधिकृत युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे.
या भजनाच्या माध्यमातून त्यांनी ईश्वर एकच असून, त्याला विविध नावांनी ओळखले जाते, हा संदेश दिला आहे. गाणे रिलीज होताच त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरही अमृता फडणवीस यांनी एक गाणे गायले होते. ‘देवाधीदेव तू महादेव, तू तो सांब सदाशिव’ असे बोल असलेले ते गीत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लिहिले होते आणि शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी त्यांच्यासोबत ते गायले होते.
Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा बहुआयामी प्रवास
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या केवळ मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणूनच नव्हे, तर त्यांच्या विविध भूमिकांसाठी ओळखल्या जातात. त्या एक यशस्वी बँकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि गायिका आहेत. गेल्या १७ वर्षांपासून त्या ॲक्सिस बँकेत (Axis Bank) कार्यरत आहेत. एक्झिक्युटिव्ह कॅशियर म्हणून सुरुवात करून आज त्या बँकेच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्या गायनाची आवड जोपासतात आणि सामाजिक कार्यातही सक्रिय असतात. त्यांच्या गाण्यांना आणि सामाजिक उपक्रमांना चाहत्यांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. ‘कोई बोले राम राम’ या नव्या भजनाने त्यांच्या गायन कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.






