Aishwarya Rai | बिहार सरकारचे माजी मंत्री आणि राजद (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांचे त्यांच्या पत्नीशी असलेले मतभेद संपण्याचे नाव घेत नाहीत. त्यांची पत्नी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी नव्याने काही मोठ्या मागण्या मांडल्या आहेत, ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
ऐश्वर्या राय यांची मोठी मागणी
सध्या पटण्याच्या कौटुंबिक न्यायालयात (Family Court) तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्या तलाकाच्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. गेल्या 6 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान, ऐश्वर्या राय यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. राबडी देवी यांच्या बंगल्याइतकं मोठं घर मिळावं. एक कार, ड्रायव्हर आणि नौकर मिळावा.
दरमहा ₹1.5 लाख रुपये आर्थिक मदत मिळावी. पटण्यातील पॉश एसके पुरी (SK Puri) भागात घर असावं. कोर्टाने ऐश्वर्या राय यांना एसके पुरी परिसरातील निवासस्थळ निवडून त्याची संपूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे. यावर पुढील सुनावणी 18 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे.
विवाद कसा सुरू झाला?
तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न 2018 मध्ये झाले होते, मात्र एका वर्षातच दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. ऐश्वर्या यांनी राबडी देवी (Rabri Devi) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी सांगितले की, राबडी देवी यांनी त्यांचे केस ओढले आणि घरातील गार्डने त्यांच्यावर हात उचलला. तसेच, त्यांचा मोबाईल हिसकावला गेला आणि त्यांच्या आई-वडिलांचा अपमान केला गेला.
या घटनेनंतर ऐश्वर्याचे वडील चंद्रिका राय (Chandrika Rai) आपल्या कार्यकर्त्यांसह राबडी आवासवर पोहोचले आणि पोलिसांच्या मदतीने ऐश्वर्याला घरी घेऊन गेले. त्यानंतर दोघांमध्ये न्यायालयीन संघर्ष सुरू झाला.
कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
पटना उच्च न्यायालयाने (Patna High Court) फॅमिली कोर्टला जुलै महिन्यात आदेश दिला होता की 6 महिन्यांत हा खटला निकाली काढावा. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. आता 18 फेब्रुवारीच्या सुनावणीत पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.






